Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार विहीर बांधण्यासाठी अनुदान!!

Table of Contents

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana In Marathi 2024

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या लेखात Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ही योजना कोणी सुरू केली? ही योजना नक्की काय आहे? कोण कोण या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे? या योजनेचे मुख्य उद्देश तसेच मुख्य वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात बहुतांश नागरिक हे मोठ्याप्रमाणात शेती हा व्यवसाय करत आहेत. म्हणूनच आपल्या देशातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपले राज्यातील शेतकरी बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, एकूणच त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने राज्य सरकार सातत्याने नवनवीन योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना राज्यसरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे, ती म्हणजेच Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) होय.

शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतु आपण आजच्या घडीला पाहतच आहोत की, हवामानात होणाऱ्या बदलांमुळे पाऊस वेळेवर येत नाही, याच पावसाची अनियमितता पाहता शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शेतातील पिकाला पाणी न मिळाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शेतातील होणाऱ्या या आर्थिक नुकसानिमुळे त्यांना आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

आपल्या शेतकरी बांधवांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून तसेच त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आणि आपले हक्काचे सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत राबविण्यात आलेली Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. त्याचबरोबर तुम्ही हा लेख आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या जवळील मित्रांना देखील शेअर करू शकताय, जेणेकरून त्यांनाही Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळेल.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावAhilyadevi Sinchan Vihir Yojana 2024
(अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झाली4 नोव्हेंबर 2022
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान देणे
योजनेचे लाभार्थीआपल्या राज्यातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ4 लाख रुपये अनुदान दिले जाणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024 शासन निर्णय➡️येथे पहा GR⬅️
योजनेचा अर्ज पाहण्यासाठी➡️येथे क्लिक करा⬅️

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 नक्की काय आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात आलेली ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी असलेल्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनामार्फत 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे त्यांच्या पिकाचे पाण्याच्या कमतरतेमुळे नुकसान होते, परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून जातो, शेतातील पूर्ण पीक सुकून जाते. अशा अनेक आर्थिक समस्यांना शेतकरी बांधवांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) राबविण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला कोणत्याही प्रकारची पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास होईल. त्याचबरोबर राज्यातील इतर नागरिक हे शेती व्यवसायाकडे आकर्षित होतील.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पाण्याच्या अभावी कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, हे Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता वाढविणे.
  • त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकरी बांधवांना पानी टंचाई जाणवू नये म्हणून सतत प्रयत्नशील राहणे.
  • राज्यातील दुष्काळग्रस्त भागात शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्या भागातील शेतकरी गुण्यागोविंदाने शेती करतील.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात आलेली ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना विहीर खोदण्यासाठी शासनामार्फत 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाला आवश्यक असेल तेवढे पाणी देऊ शकणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता पाण्याअभावी आपल्या पिकांचे नुकसान होताना दिसणार नाही.
  • शेतकऱ्यांचा या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.
  • सदर योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करतेवेळी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • ही योजना शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याची आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:योजनेअंतर्गत प्रवर्ग

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” अंतर्गत प्रवर्ग खालीलप्रमाणे आहेत.

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भूसुधार योजनेचे लाभार्थी
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • अल्पभूधारक
  • सीमांत शेतकरी
  • परंपरागत वन निवासी

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) साठी महाराष्ट्र राज्यातील लहान आणि मध्यम शेतकरी पात्र आहेत.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:फायदे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” च्या माध्यमातून काय काय फायदे होणार आहेत?

  • सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनामार्फत 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
  • त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकणार आहे.
  • आपल्या शेतात विहीर खोदल्यामुळे शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आपले शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी कोणत्याही समस्या येणार नाहीत.
  • शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सदर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकणार आहे, त्यामुळे त्याला आता पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची दुष्काळासोबत सामना करण्याची क्षमता वाढणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मनरेगा कार्यक्रमाद्वारे मजुरांकडून विहीर खोदून घेतील जाते.
  • नक्कीच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
  • शेतकऱ्याकडे कमीत कमी 2. 60 हेक्टर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातील.
  • मात्र 3 अर्जदारांची जमीन सलग असल्यास अशा वेळी ते सामूहिक विहीरीसाठी अर्ज करू शकतात.
  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे, जर शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर संबंधित जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • तसेच जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी.
  • शेतकऱ्याला ज्या जागी विहीर खोदायची आहे, त्या जागेपासून 500 फुटाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीही विहीर असता कामा नये.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विजेची सोय असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचा जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर विहीरीची नोंद असता कामा नये.
  • अर्जदार शेतकऱ्याने मनरेगा कार्यक्रमात नोंदणी केलेली असावी.
  • या पूर्वीच्या काळात जर शेतकऱ्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेच्या माध्यमातून विहीर, शेततळे इत्यादींचा लाभ घेतला असले तर संबंधित शेतकऱ्याला Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला )सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला)
  • प्रतिज्ञापत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळवायचा असल्यास अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदारास आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज करावा लागणार आहे.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
अटल बांबू समृद्धी योजना 2024प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024
मृदा आरोग्य कार्ड योजना 2024डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024
Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024:FAQ’s
Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) कोणी आणि कधी सुरू केली?

सदर योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) च्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024 (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.